E Pik Pahani! खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सर्व शेतकऱ्यांनी या मुदतीत ई-पीक पाहणी करावी, अन्यथा अनेक शासकीय लाभांपासून त्यांना वंचित राहावे लागू शकते.
ई-पीक पाहणी न केल्यास होणारे नुकसान
ई-पीक पाहणी न केल्यास तुम्हाला खालील ५ महत्त्वाच्या योजना आणि लाभांपासून वंचित राहावे लागू शकते:
- शासकीय अनुदान: विविध शासकीय योजनांतर्गत मिळणारे अनुदान बंद होऊ शकते.
- नुकसान भरपाई: पूर, अतिवृष्टी किंवा गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी भरपाई मिळणार नाही.
- पीक विमा: पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
- विविध शासकीय योजना: ज्या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे, त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही.
- भावांतर योजना: पिकांच्या योग्य भावासाठी दिली जाणारी भावांतर योजनेचा लाभही बंद होऊ शकतो.
ई-पीक पाहणीची प्रक्रिया
ई-पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘DCS’ नावाचे नवीन ॲप्लिकेशन वापरून नोंदणी करावी लागेल. जर तुमच्याकडे जुने ॲप्लिकेशन असेल, तर ते काढून टाकावे. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांनीही इतरांच्या मदतीने वेळेत ई-पीक पाहणी करावी, अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो.