राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणता अलर्ट जारी करण्यात आला आहे, हे सविस्तर पाहूयात.
विदर्भ
- यलो अलर्ट (मुसळधार पाऊस): अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- हलका ते मध्यम पाऊस: अकोला, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
मराठवाडा
- यलो अलर्ट (मुसळधार पाऊस): जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- ऑरेंज अलर्ट (अतिमुसळधार पाऊस): नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- हलका ते मध्यम पाऊस: धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मध्य आणि उत्तर महाराष्ट्र
- मुसळधार पाऊस: नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.
- यलो अलर्ट (जोरदार पाऊस): पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- हलका ते मध्यम पाऊस: धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
कोकण
- अतिमुसळधार पाऊस: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
- मुसळधार पाऊस: मुंबईसह पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.