school Holiday : हवामान खात्याने दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह अनेक जिल्ह्यांमधील शाळांना, १९ ऑगस्ट २० ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहेत.
या जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी:
- मुंबई: भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे सर्व शासकीय, खाजगी आणि महानगरपालिका शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहे.
- ठाणे: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत.
- पालघर: अतिवृष्टीचा रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत.
- रायगड: पावसाच्या रेड अलर्टमुळे रायगडमधील शाळा आणि महाविद्यालये उद्या बंद राहणार
- नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली: खबरदारीचा उपाय म्हणून या भागांमधील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिथे रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल, तिथे स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी किंवा मुख्याध्यापक सुट्टीचा निर्णय घेऊ शकतात.